Skip to main content
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट तीन दिवस संपूर्ण भारत देशामध्ये "ध्वजारोहण" महोत्सव साजरा केला जात आहे. सैनिकी शाळेतही ध्वजारोहण करून विद्यार्थी परेड संचलनाने ध्वजाला मानवंदना दिली. यानिमित्ताने शाळेत विविध उपक्रम, विविध स्पर्धा घेण्यात आल्या. आज ध्वजारोहण नंतर लगेच वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थी वेगवेगळ्या विषयांवर आपले विचार मांडले. या कार्यक्रमाला मा. सचिन भाऊ खैरे, प्राचार्य श्री. पाटील सर, डॉ. हरी कोकरे सर, श्रीमती मनिषा पाटील मॅडम,सैनिकी विभाग प्रमुख श्री. दत्ताभाऊ लोखंडे सर, कॅप्टन श्री.मुंडे सर उपस्थित होते. श्रीमती पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. वक्तृत्व स्पर्धेचे परिक्षक म्हणून श्रीमती शितोळे मॅडम, व श्री. सुर्यवंशी सर यांनी केले. सुत्रसंचलन श्रीमती पाटील मॅडम, तसेच श्री केंद्रे सर यांनी केले. सर्व शिक्षक, विद्यार्थी, उपस्थित होते.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment